‘सोशल नेटवर्किंग’ची दुनिया आभासीच

सोशल नेटवर्किंग साइट्स . रोज एकदा तरी व्हिजिटकेल्याशिवाय कुणाचे पानही हलत नसेल , इतके त्याचे महत्त्व . फ्रेंडलिस्ट वाढवण्याची इच्छा आणि चॅटिंगकेल्याशिवाय चैन न पडणे , हे या साइट वापरणाऱ्यांचे वैशिष्ट्य . आताच्या काळात कुणीही या साइट्सचे महत्त्वनाकारणार नाही . अमेरिकेत मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनात ही दुनिया आभासीच असल्याच्या मुद्द्यावरशिक्कामोर्तब करण्यात आले . अण्णा हजारे यांची चळवळ , इजिप्तमधील नागरी चळवळ बऱ्यापैकी यशस्वीहोण्यामागे सोशल नेटवर्किंग साइट्सही कारणीभूत होत्या , असा दावा अनेकांनी केला . या दाव्याला धक्कापोहोचविणारे संशोधन तिथे झाले आहे . कुठलीही संकटकालीन परिस्थिती ( भूकंप , पूर इत्यादी ), मोठ्याप्रमाणावरील नागरी चळवळी यांमध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स परिणामकारक ठरत नाहीत , असे हे संशोधनसांगते . उलट अशा प्रकारच्या साइट्सचा वापर अपेक्षित मदतकार्याला किंवा चळवळीला मारकच ठरतो , असाही दावा करण्यात आला आहे . 



अमेरिकेतील ‘ डिफेन्स अॅडव्हान्स्ड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी ‘ ने २००९मध्ये हा प्रयोग केला . या प्रयोगातीलनिष्कर्षावरून संशोधकांनी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या परिणामकारकतेवर भाष्य केले आहे . नेटवर्किंगसाइट्सचा वापर आणि त्याची प्रत्यक्षातील परिणामकारकता या प्रयोगात तपासण्यात आली . साइटच्यावापरामुळे एखाद्या संकटकालीन परिस्थितीत प्रत्यक्ष किती जण मदतीला आले एखादी चळवळ प्रत्यक्षात कितीमोठ्या प्रमाणात फोफावली , हे तपासण्यात आले . त्यासाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला . चाळीस हजारडॉलरचे पारितोषिक त्यासाठी ठेवण्यात आले . अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या अशा दहा ठिकाणी ‘ वेदर बलून्स ‘ठेवण्यात आले . कमीत कमी वेळात ते शोधून काढायचे होते . या प्रयोगामध्ये ‘ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजी ‘ ( एमआयटी ) विजेती ठरली . त्यांना त्यासाठी नऊ तास लागले . 


विजेत्यांना वृत्तपत्रे , रेडिओ , टीव्ही या पारंपरिक संवादाच्या साधनांशिवाय , केवळ सोशल नेटवर्किंगसाइट्सच्या वापराने हे बलून लवकर शोधता आले असते ; पण तसे झाले नाही . विजेत्या स्पर्धकांकडे केवळसोशल नेटवर्क होते म्हणून ते जिंकले नाहीत , तर त्यांनी ते नेटवर्क परिणामकारकरित्या उपयोगात आणले .त्यांच्या नेटवर्कच्या परिणामकारक उपयोगामध्ये साइट्स फारशा कामी आल्या नाहीत . कामी आले , ते त्यांनीप्रत्यक्ष जोडलेले नेटवर्क आणि ते वापरण्याचे त्यांच्याकडे असलेले कसब . त्यामुळे काही ठराविक परिस्थितीमध्येचसोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर परिणामकारक ठरतो , असा निष्कर्ष अंतिमतः काढण्यात आला . 


सोशल नेटवर्किंग साइट्समुळे नागरी उठावांना चालना मिळते , असा दावा करणाऱ्यांना या संशोधनाने चोखउत्तर दिले आहे . वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास साइट्सचा वापर प्रचारासाठी होऊ शकतो ; पण याप्रचाराचा परिणाम प्रत्यक्षात शंभर टक्के दिसेलच , असे मात्र नाही . 

Exit mobile version