स्मार्ट चॉइस : थ्रीएम टच पेन
स्मार्टफोनने तर आपली दुनिया केव्हाच काबीज केली आहे. आता येणाऱ्या काळात टॅब्लेटही अशाच प्रकारे सर्वत्र दिसू लागतील, असे म्हटले जाते....
स्मार्टफोनने तर आपली दुनिया केव्हाच काबीज केली आहे. आता येणाऱ्या काळात टॅब्लेटही अशाच प्रकारे सर्वत्र दिसू लागतील, असे म्हटले जाते....
तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत दररोजच्या आयुष्यात खूप बदल झालेत . बदलांची ही प्रक्रीया अशीच सातत्याने सुरू राहणार आहे . जगणं अधिकाधिक सोपं करण्याच्या दृष्टीने सध्या तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत . आयबीएमने नुकतेच आगामी पाच - दहा वर्षात लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवू शकणाऱ्या काही संशोधनांची यादी जाहीर केली आहेत . सध्या सुरू असलेले संशोधन , नवनवीन तंत्रज्ञान आणि समाजातील ट्रेंड्सवरुन ही यादी तयार करण्यात आली आहे . दृष्टी सध्या गुगलचे गॉगल्स अॅप फोटोतील गोष्टी ओळखून त्यांची माहिती देते . पण येत्या दशकाअखेर कम्प्युटर केवळ छायाचित्रांवरून ओळख पटवणार नाही तर मानवाप्रमाणे पिक्सेलनुसार समोरची गोष्ट ओळखू शकेल .उदाहरणार्थ भविष्यात लाल सिग्नल पाहून थांबायचे आहे , हे कम्प्युटरला कळेल . किंवा एखाद्या व्यक्तीला कोणते कपडे योग्य दिसतात , हे सांगू शकेल . वस्त्रोद्योगात सध्या अधिकाधिक ऑनलाइन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या तंत्राचा उपयोग सुरू आहे . हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरेल . त्यामुळे निरोगीपेशी आणि दूषित पेशींमधील फरकही ओळखता येऊ शकेल . स्पर्श गेल्या कित्येक दशकांपासून यंत्रांना स्पर्श आणि संवेदनांची जाणीव व्हावी यासाठी तज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत .त्यांना लवकरच यश मिळेल अशी चिन्हे आहेत . टचस्क्रीन मोबाइल , टॅबलेट ही त्याचीच सुरुवात आहे . सध्या इन्फ्रारेड , प्रेशर सेन्सिटिव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्श ओळखणे यासारख्या गोष्टींवर संशोधन सुरू आहे . त्यामुळे भविष्यात कम्प्युटरला कापडाला स्पर्शकरुन त्याचा प्रकार किंवा त्वचेला स्पर्श करून निदान करता येईल . गंध एखादा वास घेऊन तो फुलाचा आहे की कृत्रिम हे ओळखणे लवकरच कम्प्युटरला शक्य होणार आहे . त्यामुळे स्क्रीनवर पाहून चमचमीत खाद्यपदार्थाचा गंध सामावून घेणे शक्य होईल . एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून येणारा गंध , श्वासातील विविध घटक आणि शारीरिक हालचालींवर यंत्राच्या सहाय्याने डॉक्टर दमा , डायबिटीस ,फिट्स येणे , किडनीतील बिघाड वगैरे आजारांचे निदान करू शकतील . सध्या डिजीसेंट आणि ट्रायसेनएक्स या कंपन्या कम्प्युटरच्या मदतीने गंध तयार करणारे उपकरण तयार करत आहेत . डिजीसेंटने केमिकल स्ट्रक्चरच्या आधारे हजारो गंध एकत्र केले असून सेंट स्पेक्ट्रमच्या आधारे त्याच्या डिजिटायझेशनचे काम सुरू आहे . जेणेकरून कम्प्युटर गंध ओळखू शकेल . आयबीएमही सेन्सर्सच्या आधारे परिसरातील केमिकल्स गोळा करण्याचे तंत्र विकसित करत आहे . त्यावरून साफसफाई झाली आहे का , प्रदूषण किती आहे याचा अंदाज येऊ शकेल . सध्या पर्यावरणातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किंवा दुर्मिळ कलाकृती जतन करण्यासाठी आयबीएम यातंत्राचा वापर करत आहे . चव विविध पदार्थातील मूळ घटकांच्या मॉलेक्युल्सची चाचणी करून , मानवी मनाला आवडणारी चव आणि गंधयांचा संयोग साधून चव ओळखण्याचे तंत्र तयार करत आहे . लक्षावधी रेसिपींची तुलना करुन आयबीएम हे तंत्र विकसित करते आहे . जपानमध्येही त्सुकुबा विद्यापीठात खाद्यपदार्थाची चव आणि त्यानंतर तोंडात तयार होणा -या विविध क्रियांचे विश्लेषण करण्यासाठी फूड सिम्युलेटर विकसित करण्यात गुंतले आहे . विविध केमिकल्स एकमेकांबरोबर कशी वागतात , त्यातील बाँडिंग स्ट्रक्चर यांच्या अल्गोरिदमचे विश्लेषण करुन चव ओळखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत . ध्वनी कम्प्युटरने ध्वनीचे विश्लेषण सुरू केल्यानंतर आवाज , त्यामागील प्रेशर , ध्वनी तरंग ओळखणे सोपे होणार आहे .त्यामुळे परिसरात घडणा - या बारीकसारिक बदलांवरुन भविष्यातील हालचालींचे अंदाज वर्तवता येतील .उदाहरणार्थ , वा - याच्या आवाजात झालेला बदल यावरुन वादळ , भूकंप यांचा अंदाज वर्तवता येईल .
लेखक : मकरंद करकरे ब्लॉग म्हणजे नक्की काय हे समजून घेणे , आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे बातम्या वा विचार लोकांपर्यंत पोचवतात. बातमीदार वा...
अमेरिकेत इंटरनेटच्या खासगी वाय - फायनेटवर्कमधून गुपचूपपणे , बेकायदेशीर माहिती गोळा केल्याप्रकरणी ७० लाख अमेरिकन डॉलर्स दंड भरण्याचीतयारी गुगलने दर्शवली . अमेरिकेतील ३८ राज्यांमध्ये अॅटर्नी जनरलसोबत हा करार केला . माहितीची गोपनीयता राखण्याबाबत कर्मचाऱ्यांना कडक प्रशिक्षण देण्यास तसेच यूजर्सना वायरलेस नेटवर्कसुरक्षित करण्याविषयी जागरूक करण्याची मोहीम राबवण्यासही गुगलने मान्यता दिली . गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूइमेजसाठी पॅनोरमा फोटो काढणाऱ्या वाहनांनी वायफाय इंटरनेटच्या असुरक्षित नेटवर्कमधून बेकायदेशीररित्याडेटा गोळा केल्याच्या वृत्तानंतर सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती . गुगलनेस्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्याचे नऊ देशांमध्ये समोर आले , असे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हसी इन्फॉर्मेशन सेंटरनेस्पष्ट केले . स्ट्रीट व्ह्यू वाहनांनी अमेरिकेत २००८ ते २०१० या काळात गोळा केलेला ईमेल , पासवर्ड , वेबहिस्ट्री आणि अन्य डेटा नष्ट करण्याचे आश्वासनही गुगलने दिले .
मोबाइल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे जेथे जाईल तेथे त्याची सोबत ठरलेलीच . असेअसताना कामाच्या गडबडीत , व्यापात मोबाइल चार्ज करणं चुकून राहून गेलं आणि अचानक बॅटरी डाउनझाल्यास मात्र धांदल उडते . मग मोबाइल चार्ज करण्याची पळापळ ठरलेलीच . आता मात्र या पळापळीला एकसोपा पर्याय उपलब्ध झाला आहे . फक्त एक टेक्स्ट एसएमएस पाठवायचा की बॅटरी चार्ज्ड ! बुचकळयात पडलात ना ? पण हे खरंच आहे . लंडनस्थित ' बफेलो ग्रिड ' नामक कंपनीने सौर ऊर्जेवर आधारितमोबाइल चार्जिंग स्टेशनची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे . या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्यासाठी फक्त एकएसएमएस पाठविण्याची आवश्यकता आहे . मात्र हा पर्याय सध्या युगांडा येथील मोबाइलधारकांना उपलब्धअसून जगभरात पोहोचायचा आहे . आफ्रिका आ णि आशिया खंडात दिवसेंदिवस मोबाइलधारकांचे प्रमाण वाढत आहे . त्यातही शहरी भागापेक्षाग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा असल्याने तेथील मोबाइलधारकांना हे स्टेशन वरदानच ठरणार आहे . 'बफेलो ग्रिड ' ने या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम आफ्रिकेतील युगांडा या देशात केल्याचे वृत्त ' न्यू सायंटिस्ट ' नेदिले आहे . चार्जिंग स्टेशनमध्ये साठविण्यात आलेली उर्जा मोबाइलच्या बॅटरीला ' मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग 'या ( एमपीपीटी ) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . मात्र ,तत्पूर्वी वर म्हटल्याप्रमाणे एक टेक्स्ट एसएमएस या ' ग्रिड ' ला पाठविणे आवश्यक आहे . हे सौर स्टेशन ६० वॉटक्षमतेचे आहे . हे स्टेशन तयार करण्यासाठी सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या निकषांचे पालन करण्यात आल्याचेहीकंपनीने म्हटले आहे . मात्र , मोबाइलचे चार्ज होणे सर्वस्वी स्टेशनच्या परिसरातील तापमान आणि सूर्याचाप्रकाश यावर अवलंबून असल्याचे ' बफेलो ग्रिड ' ने स्पष्ट केले आहे . ' एमपीपीटी ' ला जोडण्यात आलेले कम्प्युटर्सतापमान आणि त्यातील बदल यांची निरीक्षणे नोंदवणार आहेत . जेणेकरून यूजरना बॅटरी चार्ज होण्यासाठीलागणारा वेळ आणि शक्यता यांची माहिती मिळणार आहे . कशी चार्ज होईल बॅटरी ? युगांडातील मोबाइलधारकांना बॅटरी चार्ज करण्यासाठी ( एका एसएमएससाठी ) ११० शिलिंग ( भारतीयचलनात दोन रुपये ) खर्च येतो . स्टेशनला मेसेज आल्यानंतर मोबाइलमधील बॅटरी सॉकेटशी स्टेशन जोडण्यातयेते आणि नेहमीप्रमाणे बॅटरी चार्ज होण्यासाठी तयार असल्याचा संकेत दिला जातो . पण संबंधित मोबाइलचीबॅटरी चार्ज होण्यासाठी दीड तासांचा अवधी लागत असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . युगांडामधील हेस्टेशन पूर्ण चार्ज झाल्यानंतर तीन दिवस कार्यरत राहू शकते आणि दिवसाला ३० ते ५० मोबाइल चार्जिंगचीत्याची क्षमता आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech