Tag: Servery

भारतातील हॅकिंग घटले

जगभरात सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त होत असतानाभारतात मात्र हॅकिंगचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनासआले आहे . जगभरात हॅकिंगचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहेत . हॅकिंगच्या बाबतीत 'टॉप टेन ' देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे . ' अकामयी टेक्नॉलॉजीस ' या कंपनीने हॅकिंगच्या प्रमाणाबाबत केलेल्या सर्वेक्षणात विविध देशांची धक्कादायकमाहिती समोर आली आहे . जगभरातील एकूण हॅकिंग पैकी ४१ टक्के हॅकिंग हे चीनमध्ये होत असल्याचे निदर्शनासआले आहे . सन २०१२च्या शेवटच्या तिमाहीत झालेल्या हॅकिंगवरून ही आकडेवारी काढण्यात आली असून ,याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे . चीनमध्ये हॅकर्सचे सर्वात मोठे नेटवर्क असल्याचे सर्वेक्षणात आढळलेआहे . यात काम करणारे काही लोक चीनच्या सैन्यातील असल्याचेही समोर आले आहे . चीन खालोखालअमेरिकेचा नंबर येतो . अमेरिकेत हॅकिंगचे प्रमाण १० टक्के असून , हे प्रमाण आधीच्या तिमाहीपेक्षा तीनटक्क्यांनी कमी झाले आहे . अमेरिकेत सर्वाधिक अनॉनिमस आणि विध्वंसक कारवाया करणारे अॅण्टिसेक लोकअसून , तेथे सायबर हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे . तिसऱ्या क्रमांकावर तुर्कस्तानहा देश आहे . या देशात हॅकिंगचे प्रमाण ४ . ७ टक्के इतके आहे . मागील तुलनेत या देशातील हॅकिंगचे प्रमाणमोठ्या प्रमाणावर वाढले आहे .  रशियाचा क्रमांक चौथा असून , या देशातील हॅकिंगचे प्रमाण ४ . ३ टक्के इतके आहे . तैवान हा देश चीनी हॅकर्सचा नेहमीचाच टार्गेट राहीला आहे . मात्र , या देशाने उभी केलेली सायबर सुरक्षा यंत्रणा चीनी हल्लेखोरांना पुरून उरली आहे . देशातील हॅकिंगचे प्रमाण १२ . ७ टक्क्यांवरून ३ . ७ टक्क्यांवर आले आहे . त्याखालोखाल ब्राझील , रोमानिया या देशांचा नंबर येतो . या खालोखाल आठव्या स्थानी भारताचा क्रमांक येतो . भारतातील हॅकिंगचे प्रमाण हे २ . ३ टक्के इतके आहे . यापूर्वी हे प्रमाण २ . ५ टक्के इतके होते , तर मागील वर्षी ते तीन टक्के इतके होते . देशातील सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली असून ,एथिकल हॅकर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहे . या खालोखाल इटली नवव्या स्थानावर तर हंगेरी दहाव्या स्थानावर आहे . जगातील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबर क्राइमकडे जगातील सर्व देशांनी विशेष लक्ष पुरविले आहे . यामुळे हल्लेखोरांना हल्ले करणे कठीण होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे . भारताच्या बाबतीत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात प्रगत देश म्हणून असे संबोधण्यात आले आहे .

मोबाइल शॉपिंग जोरात

मोबाइल शॉपिंग जोरात

हातात स्मार्टफोन आला आणि कुठलीही कामं एका क्लिकवर होऊ लागली. कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत तर बहुतेकांनी , दुकानांमध्ये जाऊन घामाघूम होत खरेदी ...

ADVERTISEMENT
error: Content is protected!