भारतीयांच्या कल्पक अॅप्सने सजले नोकियाचे अॅप स्टोअर
नोकिया स्टोअरमध्ये असलेल्या विविध अॅपमध्ये जागतिक पातळीवर भारतीय अॅप विकासकांनी आघाडी घेतली आहे. या स्टोअरमध्ये असलेल्या जवळपास 1 लाख 20 ...
नोकिया स्टोअरमध्ये असलेल्या विविध अॅपमध्ये जागतिक पातळीवर भारतीय अॅप विकासकांनी आघाडी घेतली आहे. या स्टोअरमध्ये असलेल्या जवळपास 1 लाख 20 ...
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांनी खूप मोठी झेप घेतली आहे. विंडोज , लिनक्स , अँड्रॉइडसह विविध ऑपरेटिंगसिस्टीमच्या विकासात हातभार लावला आहे . पण संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम बनविण्यात भारताला अद्याप यश आलेले नाही . पण येत्या तीन वर्षांत ही गोष्ट साध्य होऊ शकते . संरक्षण संशोधन व विकास संस्थाअर्थात डीआरडीओ इतर काही संस्थांच्या मदतीने यावर काम करते आहे . बाहेरील देशातून विंडोज , लिनक्स यासारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आयात केल्याने व्हायरसचा धोका असतो .त्यामुळे आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणे अनिवार्य असल्याचे डीआरडीओचे प्रमुख व्ही . के . सारस्वतम्हणाले . नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्याला मोठ्याप्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनीअरची गरज लागणार आहे . सध्या देशभरातील १५० इंजिनीअर्स यावर काम करतअसून संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण व्हायला आणखी तीन वर्षं लागतील . विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची परदेशी मदत घेतली जाणार नाही . त्यामुळे देशातील उद्योग , संशोधक , वैज्ञानिकांनीडीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक विभागांच्या साथीने या कामाला हातभार लावावा . त्यामुळे पूर्णपणे स्वायत्तहोणे भारताला शक्य होईल , असे आवाहन त्यांनी केले . यापूर्वीही भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याचे काही प्रयत्न झाले होते . तामिळनाडूतील लोयोला इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दीपक जॉन यानेही गेल्या वर्षी मायक्रोस ( मोबाइल इनक्युर्ड रिव्होल्युशनाइज्ड ऑपरेटिंग सिस्टीम ) ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती . दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दीपकची सिस्टीम क्रॅश झाल्याने त्याला ही प्रेरणा मिळाली होती . १०० एमबी आकाराची ही ओएस त्याने क्लाऊडवर तयार केली होती. त्यामुळे पेनड्राइव्हमधूनही ती वापरता येत होती . त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इन्स्टॉलेशनची गरज नव्हती पण सिस्टीममध्ये साठविलेल्या विविध फाइल्स यामध्ये अॅक्सेस करता येत होत्या व त्यावर कामंही करता येत होती . त्याने यामध्ये ओपन ऑफिसही दिले होते . यावर इंटरनेट आणि विंडोजवरील विविध अॅप्लिकेशन वापरता येतात . कम्प्युटर बंद केल्यावर त्यातील रॅममध्ये असणारी या संदर्भातील सर्व माहिती डिलीट होत असल्याने युझर्सला त्यांची गोपनीयता जपता येत होती .
' सुपर - सुपरकॉम्प्युटर ' च्या निर्मितीसाठी भारत , चीन , जपान , अमेरिका यांच्यात सुपरकॉम्पिटीशन सुरु झाली आहे . येत्या आठ वर्षात सुपर - सुपर कॉम्प्युटर तयार होईल . निर्मितीत भारत सगळ्यांवर मात करेल . अगदी चीनवर सुध्दा , असा विश्वास सुपर कॉम्पुटरचे जनक डॉ . विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे . गेल्या शतकात मानवी जीवनात तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणला तो संगणकानेच . पाश्चात्यांकडून आपण ते तंत्रज्ञान आयात केलं . त्यानंतर झालेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे महासंगणक ( सुपर कम्प्यूटर ). पाश्चात्यांनी हे तंत्रज्ञान आपल्याला देण्याचे नाकारले . भारताचे प्रसिध्द वैज्ञानिक डॉ . विजय भटकर यांनी हे आव्हान स्विकारले आणि भारतानेच महासंगणक तयार केला. भारताच्या याच सुपुत्राने आता महा - महासंगणक तयार करण्याचा ध्यास घेतलेला आहे . आजचा सुपर कम्प्यूटर म्हणजे उद्याचा लॅपटॉप ' तंत्रज्ञानामुळे आज जग झपाट्याने बदलते आहे . प्रत्येक क्षणी एक नवे तंत्रज्ञान जन्माला येत आहे . आजचा सुपरकम्प्यूटर हा उद्याचा लॅपटॉप झालेला असेल . त्यामुळे बदलत्या काळासोबत अपडेट राहणे आवश्यक आहे . हे जरीखरे असले तरीसुध्दा इतरांच्या एक पाऊल पुढे जाण्याचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे . याच गरजेतून२००८ साली महा - महासंगणकाची संकल्पना पुढे आली . २०१० साली याबाबत शासनापुढे प्रस्ताव मांडण्यातआला . हा प्रस्ताव मान्य करीत त्यासाठी ११ हजार कोटीं रूपयांचा निधी देण्याचे शासनाने कबूल केले आहे .बाराव्या पंचवार्षिक योजनेत शासनाने त्यासाठी ५ हजार कोटींचा निधी मान्य केला ,' अशी माहिती डॉ . भटकरयांनी मटाशी बोलताना दिली . अडचणच असते ' इनोव्हेशनची ' जननी ' एक अब्ज अब्ज प्रक्रिया ( एक ' एक्झा ') एका सेकंदात करण्याइतकी गती या संगणकाची असेल . परिणामतःत्यासाठी ' ५ हजार मेगा वॅट ' इतकी उर्जा लागणे अपेक्षित आहे . मात्र उर्जेचा तुटवडा असताना एवढी वीज केवळएका प्रकल्पासाठी देणे भारताला अशक्य आहे . त्यामुळे २० मेगा वॅट विजेच्या सहाय्याने हे काम कसे करता येईलयासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . एखादे मोठे ध्येय साध्य करताना अनेक अडचणी येतात . मात्र याच अडचणी 'इनोव्हेशन्स ' ला जन्म देतात आणि त्यातूनच ध्येय साध्य होते ' असे त्यांनी सांगितले . एका चिपवर हजारो प्रोसेसर कमी उर्जेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका चिपवर हजारो प्रोसेसर्स लावण्यात येतील . त्यांना ' नेटवर्किंग ' च्यासाहाय्याने कनेक्ट करण्यात येईल , असे त्यांनी सांगितले . २०२० ला साकारणार महा - महासंगणक हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आमच्या पुढे आहे . या प्रकल्पात आपण ' मेंटॉर ' म्हणून कार्यरतअसल्याचे डॉ . भटकर यांनी सांगितले . सामान्य माणूसही वापरेल महा - महासंगणक हा संगणक तयार झाल्यानंतर ' नॅशनल नॉलेज नेटवर्क ' अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठांना हा जोडण्यात येईल .त्यामुळे अगदी शेतात बसलेल्या शेतकऱ्यालासुध्दा आपल्या ' ४ जी ' सुविधेद्वारे या संगणकाशी कनेक्ट होता येईल. अर्थातच त्याच्या वापरासाठी काही नियमसुध्दा घालून दिल्या जातील . या संकल्पनेवर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
मिस्ड् कॉल किंवा अनोळखी क्रमांक मोबाइल यूजर्सना त्रासदायक ठरतात. पण अशा क्रमांकावरून वारंवार मिस कॉल येत गेले तर तो व्यक्ती परेशान ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech