Tag: Innovation

मोबाइल चाळिशीत

खिशात , पर्समध्ये सहज सामाविणारा आणि हातातउठून दिसणा-या सर्वव्यापी मोबाइलने बुधवारी चाळीशीतपदार्पण केले . आज घराघरात पोहोचलेल्या या दिमाखदारउपकरणाची ३ एप्रिल १९७३ रोजी मार्टीन कूपर या 'मोटोरोला ' कंपनीतील वरिष्ठ इंजिनीअरने निर्मिती केलीआणि लँडलाइनला नवा आणि अत्याधुनिक पर्याय दिला . गेल्या चाळीस वर्षांमध्ये मोबाइलने तंत्रज्ञान आणि दूरसंचारक्षेत्रात ' न भूतो न भविष्यति ' क्रांती घडवून आणली .जीनिव्हास्थित ' इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन 'च्या अहवालानुसार आजपावेतो जगभर ६ अब्जांपेक्षा अधिकमोबाइल आहेत . आजच्या घडीला जगाची लोकसंख्या ७अब्जांवर येऊन पोचली आहे . जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात मोबाइलच्या वाढीचे प्रमाण कितीतरी अधिकआहे . चाळीस वर्षांपूर्वी बाजारपेठेत आलेल्या या उपरणाची अनेकांनी हुर्यो उडविली होती . मात्र , उण्यापुऱ्या चारदशकांच्या कालखंडात या उपकरणाने सर्व विरोधकांची दाणादाण उडवित नाक मुरडणाऱ्यांच्या खिशातच नव्हेतर , मनातही जागा पटकाविली . पूर्वी केवळ हौस आणि चैनीसाठीच मोबाइल मिरविण्याचा ट्रेंड होता . आतामात्र , मोबाइल ही चैन नसून गरजेची वस्तू बनली आहे . मोबाइलचा जन्मदाता मार्टीन कूपर ( वय ८५ ) यांना मोबाइलचे जन्मदाता म्हणून ओळखले जाते . १९७३मध्ये मोबाइलची संकल्पनाकूपर यांनी विकसित करून तिचे प्रारूप सादर केले असले , तरी प्रत्यक्षात तो बाजारपेठेत येण्यासाठी दहा वर्षांचाकालावधी लागला . १९८३ मध्ये आलेल्या DynaTAX 8000X या हँडसेटची किंमत होती ३५०० डॉलर .. त्यावेळी असलेली किंमत पाहता हे उपकरण जनमानसांत लोकप्रिय होईल , अशी सुतराम शक्यताही वाटत नव्हती . 'मोबाइलची निर्मिती झाली त्यावेळी त्याचा आकार आणि वजन खूपच होते . पण आता मुठीत सामावणारेमोबाइलही बाजारात आले आहेत . ते पाहून डोळे भरून येतात ,' अशी भावपूर्ण प्रतिक्रियाही कूपर व्यक्त करतात .१९६०मध्ये ' एटी अँड टी ' ने कार टेलिफोनची निर्मिती केली . तो पाहून आपल्याला मोबाइलची कल्पना सुचली, असेही कूपर म्हणाले . सध्या जगभर ६ अब्जांहून अधिक मोबाइल फोनची विक्री झालेली असली , तरी त्यात सर्वाधिक वाटा अँड्रॉइडफोनचा आहे . ऑपरेटिंग सिस्टीम - बाजारहिस्सा ( टक्के ) अँड्रॉइड - ७२ . ४ आयओए - १३ . ९ ब्लॅकबेरी - ५ . ३ बाडा - ३ . ० सिंबियन - २ . ६ विंडोज - २ . ४ अन्य - ० . ४ ( स्रोत : गार्टनर ) 

चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

तुमच्या चेहर्‍यावरील भाव पाहून नाडीचे ठोके ओळखणारा स्मार्टफोन, Tablet  विकसित करण्यात तंत्रज्ञांना यश आले आहे. जपानच्या तंत्रज्ञांनी या शोधाचा दावा ...

आता हवेत लिहा

आतापर्यंत कागदावर लिहिणे , मोबाइलमध्ये टाइप करणेकिंवा इलेक्ट्रॉनिक पेनचा वापर करून लिहिणे , कम्प्युटर टायपिंग यासारख्या गोष्टी सर्वसामान्यांना ज्ञात होत्या .पण कधी हवेत लिहिता येईल आणि ते इमेलद्वारे पाठविता येईल , असा विचार कुणी गांभीर्याने केलाच नव्हता .केवळ काहीतरी हवेत बोटं फिरवून समोरच्याला तात्पुरत्या स्वरूपात संदेश पोहोचविण्यापर्यंत हे मर्यादित होतं .पण जर्मन संशोधकांनी हवेत लिहून इमेल , मेसेज पाठविण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणलं आहे . जर्मनीतील कार्ल्सरूह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हँडग्लोव्हज तयार केलेआहेत . यामुळे टचस्क्रीनवर , कीबोर्ड किंवा मोबाइलवर बोटांच्या आधारे एसएमएस टाइप करणे यासारख्यागोष्टी हद्दपार होतील , असा दावा या संशोधकांनी केला आहे . ख्रिस्तोफ अम्मा व सहकाऱ्यांनी तयार केलेल्याग्लोव्हजमध्ये अॅक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप बसविण्यात आले असून , या आधारे हाताच्या हालचालीटिपल्या जातात . ही उपकरणे नंतर हवेत काढलेली अक्षरे ओळखतात व त्यांना डिजिटल टेक्स्टमध्ये कन्व्हर्टकरतात . हा डिजिटल टेक्स्ट नंतर वायरलेस माध्यमाद्वारे इमेल , एसएमएस किंवा मोबाइल अॅपमध्ये पाठवलाजातो . पॅटर्न रिक्गनिशन सॉफ्टवेअर ही सिस्टीम अक्षरे ओळखते . यामध्ये जवळपास आठ हजार शब्द आणिवाक्य लक्षात ठेवण्याची क्षमता आहे . अगदी कॅपिटल आणि स्मॉल लिखाण ओळखण्याचीही सुविधा यात आहे . सध्या यामध्ये ११ टक्के वेळा त्रुटी आढळून आल्या . मात्र , लिहिणाऱ्याची पद्धत लक्षात आल्यानंतर या त्रुटी तीन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात . विशेष म्हणजे , हे ग्लोव्हज घालून एखादी व्यक्ती लिहीत आहे किंवा इतर काहीकाम करत आहे , हे ओळखण्याची सुविधा या तंत्रज्ञानामध्ये आहे .  त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी होईल .या संशोधनाला ८१ हजार डॉलर्सचा गुगल फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड मिळाला असून , या आधारे मोबाइल किंवा इतरमाध्यमातून हवेत टाइप करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास मदत होईल , अशी आशा संशोधकांना आहे . सध्या यावर संशोधन सुरू असून बाजारात विक्रीसाठी ते कधी खुले होईल , हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही . तरीभविष्यात जेव्हा केव्हा हे संशोधन सर्वसामान्यांच्या वापरात येईल तेव्हा , मात्र टायपिंगचा कंटाळा असणाऱ्यांचीसोय होईल . पण बोटांनी टाइप करण्यापेक्षा हवेत हात हलवून टाइप करण्याचा वेग निश्चितच कमी असणारअसल्याने टायपिंगचा वेग मात्र कमी होईल.

चिनी ड्रॅग्रनला भारत देणार ‘सुपर’ झटका

 ' सुपर - सुपरकॉम्प्युटर ' च्या निर्मितीसाठी भारत , चीन , जपान , अमेरिका यांच्यात सुपरकॉम्पिटीशन सुरु झाली आहे . येत्या आठ वर्षात सुपर - सुपर कॉम्प्युटर तयार होईल . निर्मितीत भारत सगळ्यांवर मात करेल . अगदी चीनवर सुध्दा , असा विश्वास सुपर कॉम्पुटरचे जनक डॉ . विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे .  गेल्या शतकात मानवी जीवनात तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणला तो संगणकानेच . पाश्चात्यांकडून आपण ते तंत्रज्ञान आयात केलं . त्यानंतर झालेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे महासंगणक ( सुपर कम्प्यूटर ). पाश्चात्यांनी हे तंत्रज्ञान आपल्याला देण्याचे नाकारले . भारताचे प्रसिध्द वैज्ञानिक डॉ . विजय भटकर यांनी हे आव्हान स्विकारले आणि भारतानेच महासंगणक तयार केला. भारताच्या याच सुपुत्राने आता महा - महासंगणक तयार करण्याचा ध्यास घेतलेला आहे .  आजचा सुपर कम्प्यूटर म्हणजे उद्याचा लॅपटॉप  ' तंत्रज्ञानामुळे आज जग झपाट्याने बदलते आहे . प्रत्येक क्षणी एक नवे तंत्रज्ञान जन्माला येत आहे . आजचा सुपरकम्प्यूटर हा उद्याचा लॅपटॉप झालेला असेल . त्यामुळे बदलत्या काळासोबत अपडेट राहणे आवश्यक आहे . हे जरीखरे असले तरीसुध्दा इतरांच्या एक पाऊल पुढे जाण्याचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे . याच गरजेतून२००८ साली महा - महासंगणकाची संकल्पना पुढे आली . २०१० साली याबाबत शासनापुढे प्रस्ताव मांडण्यातआला . हा प्रस्ताव मान्य करीत त्यासाठी ११ हजार कोटीं रूपयांचा निधी देण्याचे शासनाने कबूल केले आहे .बाराव्या पंचवार्षिक योजनेत शासनाने त्यासाठी ५ हजार कोटींचा निधी मान्य केला ,' अशी माहिती डॉ . भटकरयांनी मटाशी बोलताना दिली .  अडचणच असते ' इनोव्हेशनची ' जननी  ' एक अब्ज अब्ज प्रक्रिया ( एक ' एक्झा ') एका सेकंदात करण्याइतकी गती या संगणकाची असेल . परिणामतःत्यासाठी ' ५ हजार मेगा वॅट ' इतकी उर्जा लागणे अपेक्षित आहे . मात्र उर्जेचा तुटवडा असताना एवढी वीज केवळएका प्रकल्पासाठी देणे भारताला अशक्य आहे . त्यामुळे २० मेगा वॅट विजेच्या सहाय्याने हे काम कसे करता येईलयासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . एखादे मोठे ध्येय साध्य करताना अनेक अडचणी येतात . मात्र याच अडचणी 'इनोव्हेशन्स ' ला जन्म देतात आणि त्यातूनच ध्येय साध्य होते ' असे त्यांनी सांगितले .  एका चिपवर हजारो प्रोसेसर  कमी उर्जेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका चिपवर हजारो प्रोसेसर्स लावण्यात येतील . त्यांना ' नेटवर्किंग ' च्यासाहाय्याने कनेक्ट करण्यात येईल , असे त्यांनी सांगितले .  २०२० ला साकारणार महा - महासंगणक  हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आमच्या पुढे आहे . या प्रकल्पात आपण ' मेंटॉर ' म्हणून कार्यरतअसल्याचे डॉ . भटकर यांनी सांगितले .  सामान्य माणूसही वापरेल महा - महासंगणक  हा संगणक तयार झाल्यानंतर ' नॅशनल नॉलेज नेटवर्क ' अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठांना हा जोडण्यात येईल .त्यामुळे अगदी शेतात बसलेल्या शेतकऱ्यालासुध्दा आपल्या ' ४ जी ' सुविधेद्वारे या संगणकाशी कनेक्ट होता येईल. अर्थातच त्याच्या वापरासाठी काही नियमसुध्दा घालून दिल्या जातील . या संकल्पनेवर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले . 

Page 11 of 12 1 10 11 12
ADVERTISEMENT
error: Content is protected!